Friday, December 18, 2009

माझे बंडखोर मन...

असंच चालत आलाय जगात
कुणीतरी माघार घ्यायची .....
पण अजूनही काळात नाही
ती व्यक्ती स्त्रीच का असते?

तिचं मन ...कुणाला वाटले ठेवावे ...
कुणाला वाटले मोडावे...
इतके का ते तकलादू असते..?
कुणीही ठेवून मोडण्यासारखं..?

प्रश्न सारखेच भेडसावत असतात ....
सूर्योदय ते सूर्यास्त ...
आज , उद्या ,परवा
या वर्षी ,पुढच्या वर्षी आणि पुढेही ....
या प्रश्नांचे उत्तरं...
कधीच मिळणार नाहीत .

हे तिने केलेच पाहिजे ..
अमकं कर , तमक करू नको...
ही जबाबदारी कुणाची ?
प्रेम ,त्याग ,अश्रू , पूजा , सेवा,मनोरंजन...
हे देखील तिनेच करावं...?
का ? कुणासाठी ?कशासाठी?

आयुष्याच्या उतारावरून
एकट्याने जायचे भीती वाटते म्हणून...?
की रणरणत्या वाळूत एखादी सावली असावी म्हणून..?
की तिला कुणी अश्राप , निराधार ,अबला म्हणू नये म्हणून...?

---------------------------------------------शुभांगी...२५/११/०९


2 comments:

  1. very nice poem
    but in these modern days
    changes are happening in society
    very fastly
    womens have gained top positions in every field of life
    ha mai manta hu abhi bhi bahut lamba safar baki hai

    ReplyDelete
  2. Thanks!
    I know this.. But this was written 20 yrs Back When I was A collegian ..I had written this..
    At that time it was the same a little bit..

    ReplyDelete